शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

घामाच्या धारानंतर बरसल्या जलधारा! : माण तालुक्यात वळवाची हजेरी; वॉटर कपच्या कामाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:26 IST

सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे माळरानंही पाणीदार होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमिर ...

ठळक मुद्देश्रमदानामुळे माळरानावर साठले पाणी

सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे माळरानंही पाणीदार होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे राज्यातील अनेक गावं पाणीदार झाली आहेत. सातारा जिल्ह्यातही माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात तर या वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं आहे.

यंदाच्या तिसऱ्यावर्षी या तीन तालुक्यातील दिडशेच्यावर गावे सहभागी झाली आहेत. ८ एप्रिलपासून या गावांत वॉटर कप स्पर्धे अंतर्गत श्रमदान सुरू आहे. दररोज हजारो लोक गाव पाणीदार करण्यासाठी काम करत आहेत. तसेच अनेक संस्थांनी आर्थिक मदत दिली आहे. काहींनी पोकलेन, जेसीबीसारख्या मशिनरी देऊ केल्या आहेत. त्यामुळे जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहे.

हे कामच या गावांना पाणीदार करुन जाणार आहे.गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या उन्हात घामांनी न्हाऊन निघाल्यानंतर आता वरुणराजानेही जलाभिषेक करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर माण तालुक्यातील अनेक गावांत वळवाचा पाऊस झाला. वरकुटे मलवडी, बनगरवाडी, चिलारवाडी, शेनवडी, कुकुडवाड या गावांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या पावसाचे पाणी जलसंधारणासाठी काम झालेल्या ठिकाणी साठले आहे. माळरानावरही जागोजागी पाणी अडले आहे. त्यामुळे लोकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वॉटर कप स्पर्धेंतर्गत काम केल्याचे समाधान वाटत आहे, असे आनंदाने ग्रामस्थ सांगत आहेत.पाणीपातळी वाढणार...बनगरवाडी, वरकुटे मलवडी, कुकुडवाड, चिलारवाडीत वॉटर कप स्पर्धेचं काम चांगलं सुरू आहे. या ठिकाणी डीपसीसीटी, नालाबांध, बंधाºयातील गाळ काढणे, ओढा रुंदीकरणाचे काम झाले आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या वळवाच्या पावसाने पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. उन्हाळ्यात झालेला हा पाऊस उन्हाळी पिकांनाही फायदेशिर ठरणार आहे. तसेच आणखी एखादा पाऊस झाल्यास खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींना वेग येणार आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा